किंमत
माणसाला कडकडुन भुक लागली की चटणी भाकरी पुरेशी असते, आणि भरल्या पोटी पंचपक्वान्नही नकोसं होतं. तेव्हा योग्य वेळी जे मिळतं तेच आपलं असत. आरश्याची किंमत भलेही हिऱ्यापेक्षाही कमी असेल, पण लाखभर हिऱ्याचे घातलेले दागिने पाहायचे तर, शंभर रुपयांचा आरसाच लागतो.